Thursday, May 30, 2024

आमदार महेंद्र थोरवेंकडून जीवाला धोका - भाजप कार्यकर्ते ॲड. ऋषिकेष जोशी यांचा गंभीर आरोप; कर्जतमध्ये गुन्हे वाढले

ॲड. ऋषिकेष जोशी

कर्जत, 30 मे २०२४, प्रतिनिधी (AGS): कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून माझ्या जीवाला धोका असून याबाबत मी पोलिसांकडे तक्रार केली आहे. मात्र, रायगड जिल्हा पोलिस प्रशासन थोरवे यांच्या दहशतीखाली काम करत असल्याचा गंभीर आरोप भाजपचे कार्यकर्ते ॲड. ऋषिकेश जोशी यांनी केला आहे.  

ॲडव्होकेट ऋषिकेश जोशी यांनी कर्जतमध्ये पत्रकार परिषद घेऊन आमदार थोरवे यांच्या दहशतीबद्दल आणि त्यांच्या वरदहस्ताखाली सुरु असलेल्या अनधिकृत कामांबद्दल आरोप केले. जोशी म्हणाले, कर्जत शहरात भाई हुतात्मा कोतवाल व्यायाम शाळेच्या समोर असलेल्या खुल्या मैदानात व्यायामशाळा बांधण्याच्या नावावर व्यावसायिक दुकान गाळे बांधले आहेत. याची चौकशी करावी याबाबत कर्जत पोलिसांत तक्रार केली. तसेच माझ्या जीवाला त्यांच्याकडून धोका संभवतो, असा आरोप जोशी यांनी केली आहे.

ॲड. जोशी म्हणाले, याबाबत मी चार महिन्यांपूर्वी पत्र दिले आहे. एकमहिन्यापूर्वी तक्रार देखील दिली. मात्र माझा जबाब घेतला जात नाही. त्यामुळे माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर त्याला आमदार थोरवे जबाबदार असतील, अशी तक्रार केली आहे. मात्र रायगड जिल्हा पोलिस प्रशासन आमदारांच्या दहशतीखाली काम करत आहे, असा आरोप अँड. जोशी यांनी पत्रकारपरिषदेत केला. 

यावेळी ॲड. जोशी म्हणाले, कर्जतमध्ये काही दिवसांपूर्वी एका महिलेवर हल्ला झाला. तो गुन्हा एलसीबीकडे न देता त्याचा तपास कर्जत पोलिसांनीच केला. तसेच पळसदरी तलावात एक प्रेत सापडले आहे. याची कोणाला कल्पना नाही. तसेच पूर्वी भाजपच्या कार्यकर्ते असलेल्या आणि सध्या शिंदे गटात काम करणाऱ्या आरती माळवे यांचा पळसदरी रस्त्यावर अपघात होऊन मृत्यू झाला. याबाबत संशय व्यक्त करत स्थानिक आमदारांनी याबाबत आवाज का उठवला नाही असा सवाल केला, याबाबत सीबीआयतर्फे चौकशी करावी व या घटनेची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी केली. 

कर्जत विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. कर्जत, खोपोली, नेरळ, माथेरान पोलीस स्टेशनमध्ये त्रस्त झालेल्या अधिकाऱ्यांच्या स्टेशन डायऱ्या तपासा त्यांनी डायऱ्यांमध्ये थेट राजकीय दबाव आल्याचे नमुद केले आहे. यापूर्वी असे कधी झाले नव्हते पोलिसांवर राजकीय दबाव आहे, हे पोलिस नमुद करतात हे फार गंभीर आहे. यामध्ये कोणतीही कारवाई जिल्हा पोलिस प्रमुखांकडून होत नाही. असे देखील अँड. जोशी म्हणाले.

चौकट :

पांडूरंगाची मुर्ती स्मशानभूमीच्या जागेत ! 

नगर परिषद हद्दीत प्रति आळंदी व पंढरपूर उभारण्यात आले आहे. येथे श्रीराम पुलानजीक पांडुरंगाची ५१ फूट मूर्ती बसवण्यात आली आहे. त्या मूर्तीचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात होते. मात्र, ज्या जागेवर ही मूर्ती बसविली आहे. ती जमिन स्मशानभूमीची आहे, असा गौप्यस्फोट ॲड. ऋषिकेश जोशी यांनी पत्रकार परिषदेत केला. मुख्यमंत्र्यांची फसवणूक करुन या मुर्तीचे उद्घाटन केले. याप्रकरणी चौकशी करुन कारवाई करण्यात यावी असे जोशी म्हणाले. या प्रकरणी जिल्हाधिकारी, नगरविकास खाते, आणि जिल्हा पोलिस प्रमुखांकडे तक्रार दाखल केली असल्याची माहिती जोशी यांनी दिली.

Monday, May 27, 2024

सुधाकर घारेंनी विधानसभेचे रणशिंग फुंकले




मुंबई, मे २७, २०२४ (AGS):
काल रविवार दिनांक २६ मे रोजी कर्जत येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात कर्जत तालुक्यातील पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत सर्वसाधारण सभा पार पडली. नुकत्याच पार पडलेल्या मावळ लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचे मत जाणून घेण्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्वांनी आपल्याला मतदानादिवशी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांकडून विश्वासात न घेतल्याची आणि दुय्यम वागणुक दिल्याची खंत बोलुन दाखवली.

यावेळी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सर्वांचे म्हणणे ऐकुण घेत झालेले सर्व विसरुन जाऊयात आणि नव्या दमाने आता विधानसभेच्या कामाला लागुयात या शब्दात आपल्या कार्यकर्त्यांची समजुत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी पक्षाचे नेते सुधाकर घारे यांनीसुद्धा या गोष्टीची दखल घेत आपले स्पष्टीकरण दिले तसेच याही परिस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने प्रामाणिकपणे काम केल्याचा मला अभिमान वाटत असल्याचे सांगीतले. तसेच आपल्या भाषणात अनेक गोष्टींवर प्रकाश टाकत त्यांनी आता विधानसभेच्या तयारीला लागण्याचा संदेश सर्वांना दिला.

या विधानसभेला महायुतीकडून राष्ट्रवादीचा उमेदवार असेल हे सांगायलाही ते विसरेल नाही. एकंदरीत लोकसभेच्या निकालापुर्वीच सुधाकर भाऊ घारे विधानसभेच्या तयारीला लागल्याचे चित्र कर्जत खालापूर मतदारसंघात दिसत आहे. दरम्यान यानिमीत्ताने काही पक्षप्रवेश आणि पदनियुक्तया देखील करण्यात आल्या. यावेळी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.

माझ्या कार्यकर्त्यांचा मला गर्व - सुधाकर घारे

रविवारी पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना माननीय सुधाकर भाऊ घारे यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे तोंडभरुन कौतुक केले. त्याच झाल अस की मावळ लोकसभेसाठी झालेल्या निवडणुकीवेळी अनेक कार्यकर्ते आणि नेत्यांनी भाऊंना फोनद्वारे त्यांना शिंदे गटाचे कार्यकर्ते सामावून घेत नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या. याचा उल्लेख करत आपल्याला निवडणूकीदरम्यान काही गालबोट लागु द्यायचे नव्हते त्यामुळे मी याच्यावर आजवर बोललो नसल्याचे सुधाकर भाऊ घारे यांनी सांगीतले. अशाही परिस्थितीत माझ्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याने त्याचे काम प्रामाणिकपणे केले याचा मला गर्व आहे.

यावेळी बोलताना त्यांनी याअगोदर महाविकास आघाडीत असताना शेकापच्या उमेदवाराला निवडूण आणण्यात राष्ट्रवादीने आपली पुर्ण ताकद लावली होती आणि तो उमेदवार निवडूण देखील आणला होता. त्यामुळे आम्ही जिथे असतो तिथे प्रामाणिकपणे काम करतो. कुणी म्हणत असेल राष्ट्रवादीने काम केल नाही तर त्याला उत्तर द्यायला मी समर्थ आहे असे सुधाकर भाऊ म्हणाले. ४ जुनला असेही प्रत्येकाचा बुथ आणि ग्रामपंचायतला किती मतदान झाले हे समजेल हे सांगायला ते विसरले नाहीत.




आमचा पैलवान सांगेलत्याच्याशी कुस्ती खेळायला तयार : २०१७ च्या जिल्हापरिषदेलाच तुम्हाला चितपट केले

दरम्यान लोकसभा निवडणुकीपुर्वी शिंदे गटाच्या एका नेत्याने कुस्ती करायला मैदानात या अशा पद्धतीचे वक्तव्य केले होते. रविवारी सर्वसाधारण सभेत बोलताना त्या वक्तव्याची आठवण करुन देत आपण त्या संबंधित व्यक्तीला २०१७ च्या जिल्हापरिषदेच्या निवडणुतीतच चितपट केल्याचे सांगीतले. याचसोबत आताही आमचा पैलवान सांगताल त्याच्याशी कुस्ती खेळायला तयार आहे असे म्हटले. एकंदरीत आता लोकसभेची निवडणून संपल्यानंतर पुन्हा एकदा स्थानिक पातळीवर असणारा राष्ट्रवादी विरुद्ध शिंदे गटाचा वाद पुन्हा एकदा पेटणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

मतदारसंघातील शेवटच्या माणसापर्यंत पाणी पोहचवले जाईल - सुधाकर भाऊ घारे

दरम्यान मागील काही दिवसापासुन तालुक्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि त्याचवेळी पाणीटंचाई या अडचणींचा सामना सामान्य नागरीकांना करावा लागत आहे. याची दखल घेत सुधाकर भाऊ घारे नुकसानग्रस्त भागांना भेटी देऊन त्यांना आधार देण्याचा प्रयत्न करत आहेत वेळ पडल्यास प्रशासनाची सुद्धा मदत घेत आहेत. त्याचवेळी रविवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत त्यांनी गरज असेल त्या सर्व भागात टॅंकरने पाणी पोहचवा अशा सुचना सर्वांना दिल्या. पहिला पाऊस पडेपर्यंत शेवटच्या माणसापर्यंत पाणी पोहचवा असे प्रतिपादन यावेळी बोलताना त्यांनी केले. गेले अनेक दिवसांपासून कर्जत खालापूर मध्ये अनेक ठिकाणी सुधाकर भाऊ घारे फाउंडेशनच्या माध्यमातून टॅंकरने पाणी वाटप करण्यात येत आहे. मतदारसंघातील लोकप्रतिनिधी मात्र आपल्या कार्यालयात बसुन फक्त आढावा घेतल्याच्या बातम्या येत असतानाच सुधाकर घारे थेट लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचत असल्याचे पाहून सामान्य जनतेला खूप मोठा आधार मिळत आहे.

राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाची मालिका पुन्हा सुरु होणार

सुधाकर घारेंच्या नेतृत्वात मागील काही महिण्यांपासुन प्रत्येक रविवारी विविध पक्षातून राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये होणारे पक्षप्रवेश लोकसभा निवडणुदरम्यान महायुतीत काही वाद नको म्हणून थांबवण्यात आले होते. दरम्यान रविवारी पार पडलेल्या कार्यक्रमात सुधाकर भाऊ घारे यांनी पु्न्हा एकदा प्रत्येक रविवारी होणारे पक्षप्रवेश सुरु होतील असे सुतोवाच केले. विधानसभा निवडणुकीचे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन सुधाकर घारे यांनी पक्षविस्तार करण्यासाठी आपली कंबर कसली आहे. आता पुन्हा कोणत्या पक्षातील मोठी नावे सुधाकर घारेंच्या नेतृत्वात राष्ट्रवादीत प्रवेश करतील हे पाहण्यासारखे असेल.

Tuesday, May 21, 2024

सुधाकर भाऊ घारे यांनी दिल्या कर्जत मधील नुकसानग्रस्थ भागांना भेटी : गरजुंना मदत करत शासनाकडुन नुकसानभरपाई भेटण्यासाठी प्रयत्न करण्याचे दिले आश्वासन









मुंबई, 21 मे, 2024 (AGS):
  मागील आठवडाभरात अवकाळी पावसाने बरेच नुकसान केले. यामध्ये प्रामुख्याने विजेचे खांब कोसळल्याने अनेक गावांमधील वीजप्रवाह खंडीत झाला आहे. पोशीर ग्रामपंचायत भागातील तसेचे शेलु ग्रामपंचायत भागातील अनेक ग्रामस्थांनी सुधाकर भाऊ घारे यांना फोन करुन आपल्या अडचणी सांगीतल्या.

त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता सुधाकर भाऊ घारे यांनी घटनास्थळी भेटी देऊन झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी अनेकांच्या घराचे पत्रे उडून गेलेले होते. ग्रामस्थांना सुधाकर भाऊंशी बोलताना भावना अनावर झाल्या. घराचे छत उडुन गेल्यामुळे त्यांच्या डोळ्यात पाणी होते. परंतु आपल्या अडचणी समजुन घेण्यासाठी आपला नेता आला याचाही सर्वांना खुप आधार वाटला.








यावेळी ठरावीक कुटुंबाना भाऊंनी तात्काळ वयक्तिक मदत केली. तसेच झालेल्या नुकानीची शासनाकडून भरपाई मिळावी यासाठी त्वरीत पंचनामे करण्याची विनंती शासकिय अधिकाऱ्यांना केली. विजप्रवाह खंडीत झाल्याने अनेक कामे ठप्प पडली आहेत त्यामुळे त्याच्यावर लवकरात लवकर काम करण्याच्या सुचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन करुन दिल्या.(TGN)

Thursday, May 9, 2024

PATEL ENGINEERING LIMITED WINS LOWEST (L1) BIDDING CONTRACT IN A JOINT VENTURE IRRIGATION PROJECT OF RS. 342.76 CRORE FROM GoM

PATEL ENGINEERING

PATEL ENGINEERING IN JOINT VENTURE HAS BEEN DECLARED LOWEST (L1) FOR AN IRRIGATION PROJECT OF RS. 342.76 CRORE FROM OFFICE OF THE EXECUTIVE ENGINEER, GOVERNMENT OF MAHARASHTRA. PATEL ENGINEERING’S SHARE IN THE CONTRACT IS (35%) i.e RS. 119.97 CRORE.

MUMBAI, MAY 9, 2024 (AGS): The Office of the Executive Engineer, Government of Maharashtra has declared Patel Engineering Limited (PEL) along with its JV Partner as L1 for a Rs. 342.76 crore contract for the works involving Construction of water lifting arrangement work for first stage from submergence of Jigaon project including Civil, Mechanical, Electrical component & allied works.

The project is to be completed in a period of 24 months.

The said project is located in the state of Maharashtra and the project is to be executed in a Joint Venture, of which PEL’s share is 35%.

The scope of work involves Construction of water lifting arrangement work for LIS 1-10-11-12,8, 9, 3 ,4-5-6 of first stage from submergence of Jigaon project including approach channel, Rising Main, Pumping Machinery, Switchyard and all allied works of Civil, Mechanical, Electrical component.

About the company

Patel Engineering Ltd. (‘PEL’ or ‘Company’), is a 75-year company established in the year 1949 and have a strong presence in irrigation, tunnels and underground works for hydroelectric and dam projects. The Company has a consistent track record in execution of projects in domestic and international arena. PEL have completed over 85 dams, 40 hydroelectric projects and more than 300 km of tunnelling for clients which are mostly central PSUs or state government organizations. ENDS (AGS)


Tuesday, May 7, 2024

Pune-headquartered Piotex Industries Limited IPO opens May 10, 2024; price band fixed at Rs. 94

  • The issue will be closed on Tuesday, May 14, 2024
  • IPO comprises a fresh issue of 15,39,600 equity shares with a face value of Rs. 10 each
  • The company proposes to utilize the net proceeds from the IPO to fund its working capital requirements, general corporate purposes and meet issue expenses.
  • The company sells cotton bales and cotton yarn, which are almost always in demand by the weaving industry
  • Beeline Capital Advisors Private Limited is the sole Book Running Lead Manager, and Cameo Corporate Services Limited is the Registrar for the Issue

MUMBAI, MAY 07, 2024 (AGS): Piotex Industries Limited (“PIL” or “The Company”), a leading supplier of yarn, fabric and cotton bale, announced that its initial public offering (IPO) will open on Friday, May 10, 2024 and conclude on Tuesday, May 14, 2024. The company intends to raise approximately Rs. 14.47 crore from the offering and aims to be listed on the BSE SME platform. The price band for the issue has been fixed at Rs. 94/- per share, and the lot size will be 1,200 equity shares.

 

IPO details – Piotex Industries Limited

 

No. of shares (FV Rs. 10 each)15,40,000 Equity Shares
Price bandRs. 94
Issue sizeRs. 14.47 crore
Issue typeFresh Issue (Fixed Price)
Issue opens onFriday, May 10, 2024
Issue closes onTuesday, May 14, 2024
Reservation for Market Maker78,000 Equity Shares
Reservation for NIIs7,30,800 Equity Shares
Reservation for Retail7,30,800 Equity Shares
Lot Size1,200 Equity Shares
Lead ManagerBeeline Capital Advisors Private Limited
RegistrarCameo Corporate Services Limited
Issue to be listed onBSE SME

 

Beeline Capital Advisors Private Limited is the sole Book Running Lead Manager, and Cameo Corporate Services Limited is the Registrar for the issue.

The fixed-price IPO will comprise a fresh issue of 15,39,600 Equity Shares with a face value of Rs. 10/-. As many as 78,000 equity shares have been reserved for the Market Maker, 7.3 lakh equity shares for NIIs, and the Retail (RII) portion accounts for 7.3 lakh equity shares.

According to the RHP document, the company proposes to utilize the net proceeds from the IPO to fund its working capital requirements, general corporate purposes and meet issue expenses.

The Pune-headquartered company is a leading supplier of yarn, fabric and cotton bales and works on an asset-lite model. These products are used for various purposes, such as garments and home furnishings. The company sells cotton bales and cotton yarn through the sole selling agreement, which are almost always in demand by the spinning and weaving industry. It distributes its products to customers in various states in India, including Maharashtra, Madhya Pradesh and Gujarat.

Founded in 2019 by first-generation entrepreneurs Abhay Shriram Asalkar and Yogesh Omprakash Nimodiya, Piotex Industries Limited is equipped with cutting-edge technology and processing techniques to ensure quality output for its clients. With rich experience in the textile industry, the promoters have been instrumental in determining the company’s vision and growth strategy.

Piotex Industries Limited recorded a revenue of Rs. 118.45 crore with a profit (PAT) of Rs. 3 crore in the financial year 2023-24, compared to a revenue of Rs. 86 crore and a profit (PAT) of Rs. 2.88 crore in FY 2022-23.

For more information, please visit: https://piotexindustries.com/.ENDS

Saturday, May 4, 2024

श्रीरंग बारणेंनासाठी राष्ट्रवादीची जंगी सभा : सुधाकर घारेंच्या नेतृत्वात रॉयल गार्डनचे सभागृह झाले हाऊसफुल





मुंबई, 4 मे 2024 (AGS): 
सुधाकर घारेंनी महायुतीसाठी प्रामाणिकपणे काम करायचा आपला शब्द पाळत शुक्रवारी कर्जत खालापूर मतदारसंघात मावळचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणेंसाठी सर्वात मोठ्या सभेचे आयोजन करत मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात कार्यक्रम पार पाडला. शुक्रवार दिनांक ३ मे २०२४ रोजी मावळ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कर्जत शहरातील रॉयल गार्डन येथे हा कार्यक्रम संप्पन्न झाला. कर्जत खालापूर मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधण्यासाठी मा. श्री. श्रीरंग आप्पा बारणे उपस्थित होते. तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून मावळ विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. श्री. सुनिल अण्णा शेळके उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाला मोठ्या संखेने हजेरी लावली होती.

उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांनी मतदारसंघात केलेल्या कामांचा पाढा वाचला तसेच समोरच्या उमेदवाराकडे सांगण्यासारखे काही काम नाही असे सुतोवाच केले. यावेळी दत्तात्रय मसुरकर, हनुमंत पिंगळे, अशोक भोपतराव, भरतभाई भगत, एकनाथ धुळे, अंकित साखरे, हरेष गुढे, अमिर मनियार, सोमनाथ पालकर, भानुदास पालकर, अॅड राजेंद्र निगुडकर, ज्ञानेश्वर गायकवाड, साजीद मालदार, सरफराज टिवाले, दिपक श्रिखंडे, भगवान भोईर, राजाभाऊ कोठारी, वैशाली जाधव, मधुरा चंदन, मनिषा ठोंबरे, उमाताई मुंढे, एच. आर. पाटील, भगवान चंचे, भगवान भोईर, संतोष बैलमारे, संतोष गुरव, मनिष यादव, प्राची पाटील, रंजनाताई धुळे, स्वप्निल पालकर यांच्यासहीत दोन्ही तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कडक उन्हातही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मेळाव्याला गर्दी

यावर्षीची लोकसभा निवडणुकीच्या वेळापत्रकाचा सर्व मतदारांना एकंदरीत कडक उन्हाळ्यामुळे त्रास होत आहे. त्यामध्ये लग्नांचे मुहुर्त यामुळेच मतदानाचा टक्का यावेळी घसरल्याचे जाणकार सांगत आहेत. याचाच फटका राजकिय सभा आणि मेळाव्यांना होताना दिसत आहे. दरम्यान कर्जत खालापूर मध्ये शुक्रवारी दुपारी पार पडलेल्या महायुतीच्या संवाद मेळाव्यावर याच उन्हाचे सावट असुन सुद्धा रॉयल गार्डनचे सभागृह खचाखच भरलेल पहायला मिळाले. कर्जत शहरात एवढ्या कडक उन्हातही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जबाबदारीने संवाद मेळाव्यासाठी उपस्थित राहीले. सभागृह पुर्ण क्षमतेने भरल्याने अनेकजन सभागृहाबाहेर लावलेल्या मंडपात थांबून मान्यवरांचे भाषण ऐकत होते.

सुधाकर घारेंचा कार्यक्रम म्हणजे उत्कृष्ट नियोजन

कार्यक्रम कोणताही असला, तो छोटा किंवा मोठा माननीय सुधाकर भाऊ घारेंचे कार्यक्रमाचे नियोजन मात्र एक नंबर असते अशा प्रतिक्रीया यावेळी उपस्थितांनी दिल्या. एवढ्या उन्हात बसण्याची व्यवस्था असो किंवा मग पाण्याची आणि जेवणाची सोय सर्वांसाठी योग्य पद्धतीने करण्यात आली होती. एक चांगला नेता कधीही आपल्या कार्यकर्त्याला उपाशी राहु देत नाही अशा भावना लोकांनी बोलुन दाखवल्या. नेहमीप्रमाणे या मेळाव्यासही महीलांची गर्दी कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात होती. सुधाकर घारेंच्या नेतृत्वात पक्षात महिला संघटन मोठ्या ताकदीने सक्रिय असल्याचे पहायला मिळत आहे. त्याचाच परिणाम त्यांच्या प्रत्येक सभेला पहायला मिळतो. अनेक विरोधक त्यांच्या हळदीकुंकुच्या कार्यक्रमाला नावे ठेवतात. परंतु या माध्यमातून ते खुप मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी पक्षाशी महिलांना जोडण्यात यशस्वी झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. एकंदरीत विविध समाजघटकांना योग्य नियोजन आणि विनम्र संवादातून सुधा भाऊंचे नेतृत्व आकर्षित करत असल्याचे पहायला मिळत आहे.

सुनिल अण्णा शेळकेंनी साधला रोहीत पवारांवर निशाना

दरम्यान संवाद मेळाव्यात बोलताना मावळचे लोकप्रिय आमदार सुनिल अण्णा शेळके यांनी रोहीत पवारांवर तोफ डागली. ते म्हणाले की, "माननीय अजित दादा पवार यांनी रोहीत पवारांना बारामतीतुन जिल्हापरिषदेवर निवडून आणले. त्यानंतर कर्जत जामखेड मधून टिकिट दिल सोबतच एका मतदारसंघापुरत्या मर्यादित असणाऱ्या आमदाराला हजारो कोटिंचा निधी मिळवून दिला. आता तोच माणूस आदरणीय दादांवर टिका करत आहे." यावेळी सुधाकर घारेंवरील आपले असणारे प्रेम दाखवायला सुनिल अण्णा विसरले नाहीत. ते म्हणाले की, "सुधा भाऊ यावेळी २०२४ ला आपल्याला सोबत विधानसभेत जायचय" यानंतर सभागृहात टाळ्यांचा जोरदार गडगडाट झाला.

एकंदरीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा मेळावा महायुतीमधील सर्वात मोठा मेळावा ठरला. यामुळे सुधाकर भाऊ घारेंच्या नेतृत्वात राष्ट्रवादीने पुन्हा एकदा आपण तालुक्यात एक नंबरचा पक्ष असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले.

कर्जत-खालापूरमध्ये सुरक्षित सोसायटी अभियान - सुधाकर घारे यांचा उपक्रम; नागरिकांचा मोठा प्रतिसाद

सुधाकर भाऊ घारे फाऊंडेशन व कर्जत शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मार्फत सुरक्षित सोसायटी अभियान २०२४ सुरु असून मंगळवारी (दि.३१) रोजी कर्जत य...